Home भंडारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांकरिता लाडला पत्रकार योजना सुरू करावी- संजीव भांबोरे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांकरिता लाडला पत्रकार योजना सुरू करावी- संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस

48
0

आशाताई बच्छाव

1000744266.jpg

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांकरिता लाडला पत्रकार योजना सुरू करावी- संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस

भंडारा -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांकरता महिलांकरता बऱ्याच योजना ची घोषणा केलेली आहे व त्या घोषणा प्रत्यक्षात अमलात येताना सुद्धा दिसत आहे. परंतु जो पत्रकार ऊन ,वारा ,पाऊस याचा विचार न करता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतो. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना आपला पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा काम करतो त्या पत्रकारांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्लक्ष कसे काय करतात? आज बरेच पत्रकार आहेत की त्यांची परिस्थिती आज हालाखीची आहे. त्यांना कोणत्याच प्रकारचे मानधन मिळत नाही. त्यांना जाहिरात सुद्धा दिल्या जात नाही. अशा परिस्थितीत त्या पत्रकारांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा करावा असा एक प्रश्न निर्माण होतो ? लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची स्थिती अशी असेल तर पत्रकारांनी काय करावं ?फक्त राजकारणी लोकांच्या बातम्या देऊन त्यांना प्रकाश झोतात आणून त्यांना प्रसिद्धी द्यायची व मोठमोठे पदावर नेऊन त्यांना पोहोचवायचे मात्र या पत्रकारांकडे दुर्लक्ष केल्या जातो त्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते! त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून त्यांना लाडला पत्रकार योजना सुरू करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

Previous articleजालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट
Next articleश्री रामनगराचा राजा गणपती मंडळ कडून रक्तदान शिबिर संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here