आशाताई बच्छाव
आपापसातील मतभेद बाजूला ठेवा
आ.गडाखांचे कार्यकर्त्यांना आवाहन । मुकिंदपूरला घोंगडी बैठक. अहमदनगर (कारभारी गव्हाणे प्रतिनिधी)
सत्तेच्या माध्यमातून आपण नेहमीच राजकारणातून समाजकारणाचा वसा घेऊन विकास कामाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. प्रत्येक गावात दोन गट असले तरी सर्वांना आपण बरोबर घेत सामान वागणूक दिली. तालुक्याचा पुन्हा एकदा विकास साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी मुकिंदपूर येथे घोंगडी बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
माजी उपसरपंच प्रकाश निपुंगे यांच्या वस्तीवर कार्यकर्त्यांची बैठक
सकाळी १० वाजता झाली. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी अशोकराव उपळकर, पिचडगावचे सरपंच पोपट हजारे, मुळा कारखान्याचे संचालक सोपान पंडीत, भाऊसाहेब निपुंगे, बजरंग निमसे, नितीन निपुंगे, राजेंद्र वाघमारे, प्रा. अविनाश साळवे, प्रविण साळवे, भाऊसाहेब निपुंगे, माऊली देवकाते, दिगंबर निपुंगे, रमेश सावंत, पी.आर.जाधव,
नारायण लष्करे, भगवानराव शेजूळ, उत्तम इंगळे, बाबा साळवे, कैलास लष्करे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आ. गडाख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावात दोन गट असले तरी तुमच्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार असल्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले. गावाच्या वतीने आ. गडाख यांचा सत्कार केला.