Home उतर महाराष्ट्र आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आ.गडाखांचे कार्यकर्त्यांना आवाहन । मुकिंदपूरला घोंगडी बैठक

आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आ.गडाखांचे कार्यकर्त्यांना आवाहन । मुकिंदपूरला घोंगडी बैठक

42
0

आशाताई बच्छाव

1000618316.jpg

आपापसातील मतभेद बाजूला ठेवा
आ.गडाखांचे कार्यकर्त्यांना आवाहन । मुकिंदपूरला घोंगडी बैठक.                                                   अहमदनगर (कारभारी गव्हाणे प्रतिनिधी)

सत्तेच्या माध्यमातून आपण नेहमीच राजकारणातून समाजकारणाचा वसा घेऊन विकास कामाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. प्रत्येक गावात दोन गट असले तरी सर्वांना आपण बरोबर घेत सामान वागणूक दिली. तालुक्याचा पुन्हा एकदा विकास साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी मुकिंदपूर येथे घोंगडी बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
माजी उपसरपंच प्रकाश निपुंगे यांच्या वस्तीवर कार्यकर्त्यांची बैठक
सकाळी १० वाजता झाली. यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी अशोकराव उपळकर, पिचडगावचे सरपंच पोपट हजारे, मुळा कारखान्याचे संचालक सोपान पंडीत, भाऊसाहेब निपुंगे, बजरंग निमसे, नितीन निपुंगे, राजेंद्र वाघमारे, प्रा. अविनाश साळवे, प्रविण साळवे, भाऊसाहेब निपुंगे, माऊली देवकाते, दिगंबर निपुंगे, रमेश सावंत, पी.आर.जाधव,
नारायण लष्करे, भगवानराव शेजूळ, उत्तम इंगळे, बाबा साळवे, कैलास लष्करे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आ. गडाख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावात दोन गट असले तरी तुमच्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार असल्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले. गावाच्या वतीने आ. गडाख यांचा सत्कार केला.

Previous articleराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप.
Next articleदेगलूर महाविद्यालयात करियरकट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here