Home भंडारा जिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांवर उपासमार

जिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांवर उपासमार

114
0

आशाताई बच्छाव

1000540701.jpg

जिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांवर उपासमार

लवकरात लवकर समिती तयार करा: अन्यथा आंदोलन

प्रबोधनकार संघटनेच्या वतीने भावेश कोटांगलेचा यांचा इशारा

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)  जिल्ह्यात सन २०२१ पासून कलावंत मानधन निवड समिती नसल्याने अनेक कलावंत ठरवून दिलेली वयाची अट पूर्ण करूनही मानधनापासून वंचित आहेत. लवकरात लवकर समिती तयार करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा जिल्ह्यातील कलावंतांना आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागेल असा इशारा भंडारा जिल्हा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले यांनी दिला आहे.

राज्यात विविध क्षेत्रातील कलावंत यांची वयाची विशिष्ट अट पूर्ण केल्यानंतर राज्यशासनाच्या वतीने सरसकट ५००० रुपये मानधन दिले जाते. यासाठी पंचायत समिती मार्फत प्रस्ताव पाठविले जातात. आतापर्यंत अनेक प्रस्ताव पाठविले गेले आहेत.परंतु २०२१ पासून जिल्ह्यात कलावंत मानधन निवड समिती नसल्याने कलावंतांच्या फाईल कार्यालयात धूळ खात पडलेल्या आहेत. प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा यांच्या वतीने  जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना निवेदन देऊन सुद्धा अजून पर्यत ही कलावंत निवड समिती तयार करण्यात आली नाही. त्यामुळे ३ वर्षांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे सहित कलावंताची फाईल पंचायत समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मध्ये पडून आहेत. त्यासाठी तात्काळ निवड समिती तयार करावी व कलावंताना विशिष्ट वयानंतर  मिळणारी मानधन योजना सुरू करण्यात यावी. अन्यथा  कलावंतांच्या वतीने संगीतमय आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले यांनी दिला आहे.

Previous article१८६० पूर्वी स्थापित साकोली ‘जनपद’ केंद्रीय शाळेसाठी सरसावले मुख्याधिकारी
Next articleउपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानंतर निमगांव वायाळ येथील रेती साठ्याची लावली नायब तहसिलदार यांनी वाट,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here