Home नाशिक केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा आणि टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड...

केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा आणि टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्याच्या मागणीसाठी निवेदन सादर

52
0

आशाताई बच्छाव

1000528472.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा आणि टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्यात यावा यासाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय मजदुर रिक्षा चालक मालक सेनेतर्फे निवेदन देण्यात आले
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन ५०/- रुपये दंड जेव्हापासून पासिंग नाही तेव्हापासून दंड हा नाशिक आरटीओ कडून वसूल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रिक्षा चालक-मालक संघटना या आंदोलन करीत आहेत
त्यामुळे हा जो निर्णय आहे हा तात्काळ आपण मागे घेऊन रिक्षा चालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेला आहे तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा.अशी विनंती आपल्याला या पत्राद्वारे करण्यात आले जर तसे न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्या जाईल.कृपया आपण या निवेदनाची दखल घ्यावी.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गेडाम साहेबांना निवेदन देण्यात आले,यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे,विनोद धोत्रे,नितीन पगारे,शकील शेख,संतोष भालेराव,अमजद शेख, मुक्तार मणियार,अब्दुल सिद्दीकी,हनीफ शेख,मेहराज शेख,रफिक मंसुरी,अजू शेख,इंद्रजित भालेराव,जमीर मणियार,वैभव साळवे,अमर जाधव,अमोल ढाकणे,संतोष मनोहर,भारत जाधव,भारत झाल्टे,अमर जाधव,स्वप्नील दोंदे,उदय तायडे,गणेश चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here