Home अमरावती कोरड्या तलावात सापडले मानवी सांगण्याचे अवशेष: सांगळुदशेत शिवराज खळबळ; चर्चेला उधान.

कोरड्या तलावात सापडले मानवी सांगण्याचे अवशेष: सांगळुदशेत शिवराज खळबळ; चर्चेला उधान.

105
0

आशाताई बच्छाव

1000472962.jpg

कोरड्या तलावात सापडले मानवी सांगण्याचे अवशेष: सांगळुदशेत शिवराज खळबळ; चर्चेला उधान.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील सांगळुद शेत शिवराम मधील भागळी तलावात रविवारी सकाळी मानवी सांगडा आढळून आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकात विविध चर्चांना उधाण आले.सांगळुद येथील शेतकरी रविवारी शेतातील वन्य प्राण्यांना हुसकावण्याकरता गेले असता, त्यांना कोरड्या तलावात मानवी सांगण्याचे अवशेष ठीकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी यवदा पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी गुरुनाथ नायडू व येवद्याचे ठाणेदार लक्ष्मण इंगळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले
डॉक्टरच्या उपस्थितीत ठीक ठिकाणी पडलेल्या मानवी सांगड्याचे अवशेष गोळा करून पुढील तपासणी करता पाठवण्यात आले. अशी माहिती पोलिसांनी दिली. आढळलेल्या मानवी सांगड्याचे अवशेष कुणाचे आहे, यामागे काही घात पात आहे का, याचा शोध आता पोलीस करत आहेत. घटनास्थळी येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण ढेंगळे,अमलदार सुधाकर चव्हाण, अमोल केंद्रे, पोलीस पाटील प्रवीण गावंडे आदी उपस्थित होते.सांगळुद शेती शेवरा मधील कोरड्या पडलेल्या भागडी तलावात काही नागरिकांना रविवारी सकाळी मानवी सांगडा आढळून आला. ते जप्त केला असून, फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहे. तसेच यामागे काही घातपात आहे का, या बाबा तपास सुरू आहे. लक्ष्मण ढेंगाळे ठाणेदार येवदा त्या सांगाड्याचे अवशेष तपासणीसाठी पाठवणार आहेत.

Previous articleजालना शहर महानगरपालिकेतर्फे “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रम साजरी. 
Next articleपोहणे जीवावर बेतले, दोघांचा अकाली मृत्यू; दोघेही अमरावती फेजरपुरा येथील रहिवासी. छत्रीतलावतील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here