Home पुणे गजा मारणे’ स्टाइल’ पडली महागात…! जामिनावर सुटलेल्या गुंडांचा धुमाकूळ, पाच जणांना अटक...

गजा मारणे’ स्टाइल’ पडली महागात…! जामिनावर सुटलेल्या गुंडांचा धुमाकूळ, पाच जणांना अटक 🛑

99
0

राजेंद्र पाटील राऊत

✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे  –⭕ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंड आणि साथिदारांनी उत्तमनगरमधील शिवणे परिसरात फटाके वाजवले. इतकेच नव्हे, तर गुंडांनी नागरिकांना धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करून पाचजणांना अटक केली आहे.

सागर भालेराव वारकरी (२१), अविनाश रामप्रताप गुप्ता (२०), आकाश सिब्बन गौड (२०), सागर राजेंद्र गौड (१९), सूरज राजेंद्र गौड (२५, सर्व रा. शिवणे) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अभिषेक गुप्ता याच्यासह सहा ते सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संतोष नांगरे यांनी उत्तमनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्यावर्षी आरोपी सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड, सागर गौड यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

मंगळवारी ते कारागृहातून बाहेर आले.यानंतर आरोपी आणि साथीदार मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शिवणेतील राहुलनगर येथील पीएमपी थांब्याजवळ आले. त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडले. नागरिकांना शिवीगाळ करून परिसरात दहशत पसरवली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचजणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.⭕

Previous articleकोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
Next articleगजा मारणे स्वत:ला रॉबीनहूड समजतो का…? हायकोर्टाने फटकारले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here