राजेंद्र पाटील राऊत
बिलोली तालुक्यातील मौजे आरळी येथे दिनांक 21 जानेवारी ते 27 जानेवारी 2021 पर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांचे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली तालुक्यातील मौजे आरळी येथे श्रीमद् भागवत कथेचे ज्ञानयज्ञ आयोजन सोहळा दिनांक 21 जानेवारी 2021 ते 27 जानेवारी 2021पर्यंत एकूण सात दिवस वेळ दुपारी एक ते चार या वेळेत भागवत कथेचे आयोजन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भाविकांनी तोंडाला मास्क बांधून सोशल डिस्टंसिंग चे पालन करत सानिटायझरचा वापर करून या भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून करण्यात आले आहे.