Home Breaking News *मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद;सप्टेंबरमध्ये सरकारला धक्का देणार!*

*मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद;सप्टेंबरमध्ये सरकारला धक्का देणार!*

110
0

*मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद;सप्टेंबरमध्ये सरकारला धक्का देणार!*
*मुंबई (विजय पवार-साईप्रजित मोरे युवा मराठा न्युज नेटवर्क)-* कोपर्डीच्या अत्याचारी घटनेनंतर संपूर्ण मराठा समाज संघटीत झाला.न भुतो न भविष्यती अशी क्रांती झाली.महाराष्ट्र बरोबरच देश विदेशातही मराठा क्रांती मोर्च निघालेत.तरीही कोपर्डीच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही.गुन्हेगारांना अद्यापही फाशी झालेली नाही.
आणि त्यातच रक्षाबंधनाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या तांबडी गावातल्या म्हाळदेंकर कुटूंबियातल्या चौदा वर्षिय मुलीवर लैगिंक अत्याचार करुन नंतर तिचा खून करण्यात आला,या घटनेने पुन्हा एकदा कोपर्डीची पुनरावृत्ती झाली.मात्र कुठल्याही राजकिय नेत्याने या घटनेची गंभीर दखल घेतलेली नाही.गेल्या चाळीस वर्षात मराठा समाजावर फक्त अन्यायच झालेला आहे.आणि आताच्या या घटनेत देखील मराठा समाजाचे अनेक आमदार मंत्री असताना त्यांनी तांबडी गावाला भेट देऊन या प्रकरणात न्याय देण्याबाबत कुठलीही ठोस भुमिका स्विकारलेली नाही.त्यामुळे येत्या २६सप्टेंबर पर्यत तात्काळ तांबडी व कोपर्डी प्रकरणात न्याय मिळाल्यास साठावा क्रांती मोर्चा तांबडी गावातुन निघेल व सरकारला धक्का देईल अशा स्वरुपाची घोषणा काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राजन घाग यांनी केली.यावेळी पत्रकार परिषदेस क्रांती मोर्चाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी व समनव्यक बहुसंख्येने हजर होते.

Previous article🛑 BSNL आता घरोघरी इंटरनेटची सुविधा देणार, लाँच केले BookMyFiber पोर्टल 🛑
Next article*मुंबईत 1000 कोटी रुपयांची 191 किलो ड्रग्स पकडली, आतापर्यंत 2 जणांना अटक*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here