पावसाने दांडी मारली, आणि खरीप पिकाची रोपे करपली.(सुरगाणा तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
सुरगाणा तालुक्यात भात, नाचणी, वरई, या सारखी प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांची रोपं अगदी लागण करण्याच्या टप्यात आली असून गेले १५ दिवसापासून पावसाने दांडी मारली असून या भागातील खरीप पिकांची रोपं उन्हाच्या तडाख्याने करपू लागली आहेत. यामुळे या भागातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.
मान्सून कधी येणार याकडे बळीराजा नजर लावून बसला आहे.