Home कोरोना ब्रेकिंग लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा

लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा

97
0

⭕लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा ⭕
पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे -: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता चौथा लॉकडाऊन सुरू झाला आहे. यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये जप्त केलेल्या पुणेकरांच्या ३० ते ४० हजार गाड्या परत देण्याची मागणी पुणे बार असोसिएशन कार्यकारिणी सदस्य आनंद धोत्रे आणि आकाश मुसळे यांनी पत्राद्वारे, तसेच ट्विट करून पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे केली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये विनाकारण आणि इतरत्र फिरत असताना पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत.

शहरात कंटेन्मेंट भाग वगळता अन्य भागात हळूहळू व्यवहार सुरू झाले आहेत. कोरोनासोबतच नियमांचे पालन करीत नोकरी, कामधंदा सुरू होणार आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने नागरिक स्वतःच्या वाहनांवर अवलंबून असल्याने त्यांना वाहनाअभावी कामकाजाकरिता कार्यालय, व्यवसायाच्या ठिकाणी जाणे शक्य होणार नाही. पोलिसांनी जप्त केलेली वाहने ४० ते ५० दिवसांपासून एकाच ठिकाणी रस्त्यावर, पोलीस ठाण्याच्या आवारात वापराविना पडून आहेत. बॅटरी, इंजिन, टायर इ. खराब होण्याची दाट शक्यता आहे. पावसामुळे वाहनांचे नुकसानदेखील होऊ शकते. वाहनाचे नुकसान झाल्यास नागरिकांना दुरुस्तीकरिता नाहक खर्चाला आणि त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करून कायद्याच्या चौकटीत वाहने परत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अ‍ॅड. आनंद धोत्रे व अ‍ॅड. आकाश मुसळे यांनी केली आहे.

Previous articleचाणाक्ष महिला सरपंच !मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
Next article३६ वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या हेड नर्सचा कोरोनामुळे मृत्यू !सहकाऱ्यांनी साश्रू नयनांनी दिला निरोप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here