Home जळगाव रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने केला अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने केला अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान

21
0

आशाताई बच्छाव

1001306683.jpg

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने केला अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने १६ अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान केला
सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सौरभ जोशी व अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे उपस्थित होते.
या सन्मानाने आमच्या अग्निशमन दलाचे मनोबल नक्कीच उंचावेल तसेच आग, भूस्खलन, पूर, रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा यात आहे तसेच कुठे अपघातात वाहने अडकली तर त्यासाठी कटर ची सुविधा देखील या वाहनात उपलब्ध असून गस्तीसाठी देखील या अत्याधुनिक वाहनाचा उपयोग होतो असे सौरभ जोशी व अक्षय घुगे यांनी सांगितले.
यावेळी ईश्वरलाल पाटील, बापूराव ठाकूर, संदीप देशमुख चंद्रकांत राजपूत कपिल पंगरे, ज्ञानेश्वर चौधरी, विजय चौधरी शशिकांत चौधरी, रमेश राठोड, संदेश पाटील, राहुल राठोड रणजीत जाधव, सागर देशमुख, नितीन खैरे, रितेश देशमुख व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल मालपुरे यांनी केले .
यावेळी किरण देशमुख, प्रितेश कटारिया, राजेंद्र पाटील चंद्रेश लोडाया, सौ पूजा मालपुरे, सौ मनीषा मालपुरे, सौ विजया मालपुरे, श्रीकांत मोरकर, निलेश ढोले, पंकज पिंगळे, मंदार चिंधड़े, सुनील वाणी, राजेंद्र कटारिया, बलदेव पुंशी, राकेश बोरसे व सुनील मालपुरे उपस्थित होते.
सूत्रसंचलन डॉ. रवींद्र निकम व बाळासाहेब सोनवणे यांनी केले. आभार निलेश शर्मा यांनी मानले.

Previous articleचाळीसगावात घरातून 1 लाख 68 हजारांचा ऐवज लंपास
Next articleचालकासह मोटारसायकल कन्नड घाटात कोसळली – महामार्ग पोलीसांनी जखमीला काढले वर..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here