Home जालना संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर

19
0

आशाताई बच्छाव

1001351011.jpg

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर
दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा
जालना,(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-मराठवाडा ही संताची भूमी आहे. या भूमीच्या संतानी नेहमी समतेचा आणि शांतीचा संदेश दिला आहे. खर्‍या अर्थानं तो जपण्याची वेळ येवून ठेपली आहे असे प्रतिपादन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ह.दर्गा जानुल्लाह शाह (बाबा) यांच्या 353 व्या उरुस निमित्त शनिवारी रोजी आयोजित कार्यक्रमात केले.
ह. दर्गा जानुल्लाह शाह (बाबा) खुदाम व्यवस्थापन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही (353) वा उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. खोतकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी   काँग्रेस (अजितदादा गट)चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, जेष्ठनेते इकबालपाशा शहर जिल्हा काँँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राज्य हज कमिटीचे फेरोजलाला तांबोळी, शिवसेना (उबाठा) चे शहर प्रमुख बाला परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, शिवसेना (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख विष्णु पाचफुले, माजी गटनेते गणेश राऊत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मिर्जा अनवर, वसंत जाधव, अ‍ॅड महेश धन्नावत आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून व्यवस्थापन समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना श्री खोतकर म्हणाले की,  ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा गौरवशाली इतिहास असून त्यांनी आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी आणि माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी व्यतीत करून समतेची शिकवण समाजात रुजविली आज याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक एकवटलेले आहे.

Previous articleजिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी प्रा. व माध्यमिक आश्रम माहोरा शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक
Next articleडॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here