Home वाशिम अनिकेतच्या मारेकऱ्यांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

अनिकेतच्या मारेकऱ्यांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

383
0

आशाताई बच्छाव

1001344729.jpg

अनिकेतच्या मारेकऱ्यांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

वाशिम : (गोपाल तिवारी)

वाशिम जिल्ह्यातील व अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाबुळगाव येथील अनिकेत संतोष सादुडे (वय 14 वर्ष) या बालकाचे 12 मार्च रोजी रात्री बारा वाजता लग्न समारंभातून अपहरण करून त्याचं रात्री त्याचा गळा आवळून खून करण्यात आला.

पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही पाहिजे म्हणून अपहरण नाट्य घडवून आणून अनिकेतच्या सुटकेसाठी 60 लाखाची खंडणी मागितली असे आरोपीने कबूल केले.

21 मार्च 2025 रोजी हे अपहरण व हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी प्रणव पद्माने (वय वीस वर्ष) व शुभम इंगळे (वय वीस वर्ष) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आज न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने 29 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

21 मार्च रोजी वाशिम पुसद मार्गावर अनिकेतचा मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. अल्पवयीन अनिकेत याचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. 12 मार्चला हे अपहरणाचे प्रकरण घडले आणि त्यानंतर पोलिसांना अनिकेतच्या शोधासाठी तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरू केला मात्र तरीही अनिकेतचा थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बारा पोलीस पथक शोधकार्यासाठी लावले होते. अखेर दहाव्या दिवशी अनिकेतचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने 29 मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे.

सदर घटनेचा तपास अनसिंग पोलीस स्टेशनचे फौजदार करत आहेत.

Previous articleपीएम श्री शाळांच्या शिक्षकांसाठी अभ्यास दौरा
Next articleमाजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here