आशाताई बच्छाव
अहिल्यानगरमधील तृतीयपंथींचा भाजपमध्ये प्रवेश
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील तृतीयपंथी यांच्या अनेक वर्षांपासून विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाही. तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांनी तृतीयपंथींचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय मिळावा या हेतूने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी तृतीयपंथी उपस्थित होते.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, तृतीयपंथींचे अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यात येणार व एकसमान जगण्याचा अधिकार देणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लवकरच काजल गुरु यांना मोठी जबाबदारी देणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काजल गुरु यांनी तृतीयपंथी यांच्या विविध मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलने मोर्चे केलेली आहे व याकडे दुर्लक्ष होत असून अनेक वर्षापासून तृतीयपंथी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व आयुक्तांना विविध मागणी केलेली आहे.