Home पालघर वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.

वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.

54
0

आशाताई बच्छाव

1001215923.jpg

वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.पालघर :सौरभ कामडी 
मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितले की आपल्या जीवनात दहावी आणि बारावी ची परीक्षा जीवनाला कलाटणी देणारी परीक्षा असते त्यामुळे या परीक्षेत आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन भविष्य घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख वक्ते पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगितले व विद्यार्थ्यांना कष्ट मेहनत घेतली तर कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकता अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसभापती प्रदीप वाघ, प्रमुख वक्ते म्हणून मोखाडा पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले, सरपंच लता वारे,
उपाध्यक्ष मिलिंद झोले, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, स्पार्क फाउंडेशन चे नितीन पिठोले, संचालक चुनीलाल पवार शाळेचे मुख्याध्यापक ठवरे सर इत्यादी पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनया वाघ हिने केले.

Previous article2.42 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, बोईसरमध्ये मोठी कारवाई
Next articleबारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here