Home नाशिक भगूर रेल्वे बोगदा नागरिकांना सद्या गैरसोईचा

भगूर रेल्वे बोगदा नागरिकांना सद्या गैरसोईचा

44
0

आशाताई बच्छाव

1000781692.jpg

भगूर रेल्वे बोगदा नागरिकांना सद्या गैरसोईचा(सुदर्शन बर्वे )भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मभूमी असलेले भगूरचे मुख्य प्रवेशद्वार असलेला रेल्वेचा बोगदा त्या खालील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटवावी व तेथे रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करून अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे या बोगद्याकडून अनेक शाळकरी मुलांचा व ज्येष्ठ नागरिक कामगार वर्ग यांचा वावर असतो तसेच हा रस्ता भगूरच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा एकमेव रस्ता आहे तेथील समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती भनपा प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे वारंवार निवेदन देऊन ही कोणती ही कार्यवाही होत नाही, या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, गाड्या चालवताना अनेक वेळा पाणी नागरिकांच्या अंगावर उडते त्याने अनेक वेळा वादविवाद ही होतात यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर तेथे जन आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा म.न.से.भगुर शहर उपाध्यक्ष श्री.श्याम देशमुख, भा.ज.पा. उपाध्यक्ष निलेश हासे, स्वच्छता व पर्यावरण दूत भ.न.पा.श्री.सुनील जोरे, राजू बलकवडे, श्री. प्रवीण वाघ व व्यापारी वर्गातर्फे देण्यात आला…

Previous articleसोनई जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती
Next articleफार्मसी कॉलेज ने राबविले स्वच्छता अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here