आशाताई बच्छाव
लातूर येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक १६/०९/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की, १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो याचेच औचित्य साधून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दोन दिवशीय समितीचे १४ वे महाअधिवेशन लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन १७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर असे दोन दिवसाचे राहणार असून या अधिवेशनात वीर माता, वीर पत्नी, वीर जवान, आणि वीर पिता व स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. नामदार संजयजी बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात संघटनेचे अविरत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या महाअधिवेशनामध्ये राज्यासह ,देशातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवावी आणि शासन व प्रशासन यांना संघटनेची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
या अधिवेशनामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्षांनी दिली आहे. या संघटनेच्या अधिवेशनात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या पाहुणच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना धडकी भरल्याशिवाय राहाणार असे मत राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतरावजी देशमुख यांनी व्यक्त केले आहे.या कार्यक्रमाला ले.कर्नल सैनिक कल्याण अधिकारी लातूर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती हे असणार आहेत. संघटनेचे काम घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे गाव खेड्यामध्ये संघटनेचा कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निस्वार्थ समाजाची सेवा करुन एक आदर्श निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश हिताचे व समाज हिताचे त्या दृष्टीने काम करण्याची गरज असुन यामुळे प्रशासनाची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.यासाठी १७ व १८ सप्टेंबर रोजी लातूर येथे होणाऱ्या दोन दिवशीय महाअधिवेशनामध्ये सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री वसंतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.