Home बुलढाणा लाडक्या योजनेत’ पैसे टाकले ‘दाजी’च्या सोयाबीनमधूनच ढापले ! -महायुती सरकार एवढे सत्तालोलूप...

लाडक्या योजनेत’ पैसे टाकले ‘दाजी’च्या सोयाबीनमधूनच ढापले ! -महायुती सरकार एवढे सत्तालोलूप झाले काय ? – मोत्यासारख्या सोयाबीनला कवडीमोल भाव !

52
0

आशाताई बच्छाव

1000679369.jpg

‘लाडक्या योजनेत’ पैसे टाकले ‘दाजी’च्या सोयाबीनमधूनच ढापले ! -महायुती सरकार एवढे सत्तालोलूप झाले काय ? – मोत्यासारख्या सोयाबीनला कवडीमोल भाव !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- रक्तासारखा घाम गाळून मोत्यासारखं सोयाबीन पिकवलं पण आता बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळतोय, सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी दरानं सोयाबीन विकलं जात असल्यानं शेतकरी ‘दाजी’ संकटात तर ‘लाडकी बहीण’ दीड हजार खात्यात पडल्याने बँकेत गर्दी करताना दिसून येत आहे. परंतु ‘लाडक्या बहिणींना’ महिन्याकाठी दीड हजार देण्यात येत असले तरी, ही सर्व रक्कम ‘दाजीच्या’ सोयाबीनमधून ढापले जात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
महायुती सरकार एवढे सत्तालोलूप झाले काय? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मूळ प्रश्नांची
सोडवणुक न करता ‘लाडक्या’ योजना सुरू करण्यात सत्ताधारी धन्यता मानत आहेत. सध्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकीकडे ‘लाडक्या बहीणींना’

दरमहा दिड हजार रुपये देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी ‘दाजींच्या’ सोयाबीनला कोडीमोल भाव मिळत आहे. या

‘लाडक्या बहिणीला’ देण्यात येणारे हे सगळे पैसे ‘दाजीच्या’ सोयाबीनमधून मारले जात असल्याचा उघड आरोप होत आहे. सोयाबीनला सरकारचा हमीभाव ४९०० रुपये प्रतिक्विंटल मिळतो. परंतु सरकारी धोरणामुळे

सध्या बाजारातील अनिश्चिततेची परिस्थिती पाहता
४००० रुपये दरानेही सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यापारी धजावत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शेतकरी ‘दाजी’ हवालदिल दिसून येत आहे.

यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पेरण्या पूर्ण झाल्याने आणि पावसानेही कमी जास्त प्रमाणात अपेक्षीत साथ दिल्याने सोयाबीन उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे. परंतु मागील पाच वर्षातील सर्वात कमी दराने सध्या नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनची खरेदी सुरू आहे. कोसळलेले सोयाबीनचे दर पाहून सोयाबीन उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाल्याचे अस्वस्थ चित्र आहे.

Previous articleपाणीदार येळगाव धरणाचे झाले जलपूजन !’ -आमदार गायकवाड म्हणाले.. येणाऱ्या काळात पाणी प्रश्न कायमचा मिटविणार !
Next articleनांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here