आशाताई बच्छाव
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
—————————————
नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी @ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ———–—————————–जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी करत जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आज शनिवारी शहरातील गांधी चमन येथे तोंडाला काळी फित लावून धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बंद मागे घेऊन मुक निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंटयाल, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी बाबू पवार, माजी गटनेते गणेश राऊत बाबूराव सतकर, राम सावंत, शहर जिल्हाप्रमुख बाला परदेशी, युवा नेते अक्षय गोरंटयाल, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, वसंत जाधव, गंगुबाई वानखेडे, मनकर्णाताई डांगे, मंगल मिटकर, शितलताई तनपुरे, दिनकर घेवंदे, शेख इब्राहिम, वैभव उगले, राजेंद्र जाधव, रमेश गौरक्षक, विनोद रत्नपारखे, जगदीश भरतीया, राधाकिसन दाभाडे, शेख शकील, आदी उपस्थित होते.