Home गडचिरोली माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी विज पडून अपघात झालेल्या आत्राम व...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी विज पडून अपघात झालेल्या आत्राम व दिवटीवार या अपघात ग्रस्त कुटुंबाला केली 20000/-(वीस हजार रुपये) तात्काळ आर्थिक मदत..!

21
0

आशाताई बच्छाव

1000665406.jpg

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी विज पडून अपघात झालेल्या आत्राम व दिवटीवार या अपघात ग्रस्त कुटुंबाला केली 20000/-(वीस हजार रुपये) तात्काळ आर्थिक मदत..!

मुलचेरा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंदुकपल्ली गावातील काही शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करत होते.शेतात काम करीत असताना पाऊस सुरू होता आणि विजाचा कड-काडट सुरू झाला.त्यावेळी 3 वाजता दरम्यान अचानक वीज पडली त्यामुळे तिथे काम करत असलेल्या शेतकरी नितेश दिवटीवार आणि काजल आत्राम यांच्यावर आघात झाला,या दोघांना ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथे उपचारसाठी भरती करण्यात आले,नितेश दिवटीवार हा शेतकरी अत्यंत गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील रेफर करण्यात आले. तर काजल आत्राम या महिलेचा उपचार मूलचेरा येथे सुरू आहे.ही माहीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी फोन करून रुग्णाची माहिती घेतली आणि त्यांना तात्काळ 20000/-(वीस हजार रुपये) आर्थिक मदत आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पाठवली. आणि आपण सर्वपरी सहकार्य करणार असे आश्वासन दिले.!

यावेळी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप आत्राम, ग्रामपंचायत सदस्य बादल शाह,नगरसेवक विजय कुडमेथे,गणेश बँकावार,पवन आत्राम, विजय शेट्टीवार,दिगंबर गावडे, विजय गेडाम,सदाशिव आत्राम हे उपस्थित होते.

Previous articleअखेर वनमजुरांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी! भाजपच्या प्रयत्नांना यश!
Next articleबदलापूरची घटना दुर्दैवी, निदंनीय आणि मन हेलावून टाकणारी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here