Home जालना शेतकऱ्यांना सिंचन विहीर व जनावरांचे गोठे तात्काळ द्या अन्यथा पंचायत समिती ताब्यात...

शेतकऱ्यांना सिंचन विहीर व जनावरांचे गोठे तात्काळ द्या अन्यथा पंचायत समिती ताब्यात घेऊ- मयुर बोर्डे

56
0

आशाताई बच्छाव

1000535447.jpg

शेतकऱ्यांना सिंचन विहीर व जनावरांचे गोठे तात्काळ द्या अन्यथा पंचायत समिती ताब्यात घेऊ- मयुर बोर्डे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
माहोरा जालना प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 10/07/2024
जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खिल्लारे यांची भेट घेऊन जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना सिंचन विहीर व जनावरांचा गोठा तात्काळ द्या अशी मागणी करत निवेदन दिले.महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीने सिंचन विहिरी शेतकऱ्यांना दिल्या परंतु जालना जिल्ह्यातील जाफराबाद व भोकरदन या दोन तालुक्यात एकही विहीर शेतकऱ्यांना दिली नाही.पाच वर्षांत सरकारच्या या योजनेचा बोजवार दोन्ही तालुक्यातील बी डी ओ ने केला.प्रस्ताव दाखल असताना सिंचन विहिरी का दिल्या नाहीत याचा खुलासा द्यावा अशी मागणी मयुर बोर्डे यानी केली.सरकार म्हणजे नुसता घोषणांचा बाजार आहे असे देखील या वेळी ते म्हणाले.तात्काळ सिंचन विहिरी व जनावरांचा गोठा शेतकऱ्यांना दिल्या नाही तर पंचायत समिती कार्यालय ताब्यात घेऊ असा इशारा मयुर बोर्डे यांनी प्रशासनाला दिला.या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे,तालुका संपर्क प्रमुख प्रदीप नरवाडे, तालुका उपाध्यक्ष गजानन भोपळे,भीमराव राऊत, आरिफ शहा नंदकिशोर इंगळे, अंकुश इंगळे,शरद तेलग्रे, अनिल नरवाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते.

Previous articleईश्वराच्या नामस्मरणात सुखद लहर निर्माण करण्याची ताकद असते.
Next articleनांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here