आशाताई बच्छाव
व्यथा बळीराजाची : कृषीप्रधान अशा आपल्या भारत देशात आपल्या अन्न दात्याला भोगावे लागतात दुःख .
रावेर जळगाव. दि.२५.०६.०२४. हर्षल पाटील , ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज
आपला देश हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो मात्र आपण ज्या बळी राज्याच्या जीवावर सुखाचे जीवन जगतो मात्र त्याच बळी राजाला किती कष्ट करावे लागतात आणि किती संकटांना सामोरे जावे लागते. त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. बि बियाणे यांचे भाव गगनाला भिडले. त्यात निसर्ग साथ देत नाही. आणि त्यात मोठी गोष्ट चोरट्या चा धाक अशा परिस्थितीत या बिचाऱ्या ने करावे तरी काय हा मोठा प्रश्न त्याच्या समोर येतो .
अशीच एक घटना काल रावेर तालुक्यातील अजनाड या गावातील शेतकऱ्या सोबत घडली . येथील वर्षा प्रदीप पाटील या शेतकऱ्या च्या शेतात तील विद्युत ट्रान्सफॉर्मर च चोरट्यांनी फोडून त्यातील ऑईल आणि तांब्याची तार घेऊन गेले. पेरणी करून पंधरा दिवस झाले पीक लहान असताना त्याला पाण्याची खुप गरज आहे .त्यात वरुण राजाने ही पाठ फिरवली आहे . या बिचाऱ्या ने करावं तरी काय म्हणून आज आपल्या देशात शेतकरी हा सुरक्षित नाही . या कडे सरकार मायबापा ने लक्ष दिले पाहिजे . आणि आपला देश हा सुजलाम सुफलाम बनवायला पाहिजे .