Home अमरावती अमरावती ग्रामीण ची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!

अमरावती ग्रामीण ची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!

35
0

आशाताई बच्छाव

1000485874.jpg

अमरावती ग्रामीण ची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .
अमरावती.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलामध्ये १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात झाली असून, त्या मालिकेत २१ जून रोजी सकाळी मैदानी चाचणी करता १२०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते; परंतु गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान पूर्णतः वले झाले. त्यामुळे त्यावर २१ जून रोजी बोलावलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेता आली नाही. ज्या उमेदवारांची २१ जून रोजी मैदानी चाचणी होती त्यांची ती चाचणी आता १६ जुलै रोजी होणार आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकार मुळे धरती रद्द झाल्याच्या आफवांना पूर्णविराम मिळाला आहे. ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया२२ जून व यापुढे दररोज नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी २२ जून सहा व त्यानंतर मैदानी चाचणी असेपर्यंत दररोज त्यांनी नेमून दिलेल्या दिनांकास पहाटे४.३० वाजता बाय टेकडीच्या बाजूला असलेल्या जोग स्टेडियम येथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे मैदान मध्ये झाल्याने केवळ शुक्रवारची भरती प्रक्रिया रद्द झाली आहे. संपूर्ण भारतीय प्रक्रिया रद्द झालेली नाही त्यामुळे कृपया उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleबुधवत साहेब जरा जीभ आवरा हो.. – शिवराळ भाषाने विधानसभेत मावळणार अशा? – म्हणे गांडूची औलाद नाही
Next articleपंकजाताई मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here