आशाताई बच्छाव
!राज्य सरकारने नागरिकांसाठी रेतीची व्यवस्था करावी!
!किमान शून्य राजस्वावर घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी!
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचे घरकुलाचे बांधकाम सुरू आहेत तसेच मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा घराचे व ईतर बांधकाम सुरू आहेत परंतु प्रशासनाच्या काही कारणामुळे सध्या नदीघाट असून मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध असून सुद्धा राज्य सरकारने रेती उपसा करण्यासाठी निविदा परवानगी न दिल्याने सध्या रेती उपसा बंद आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील हजारो घरकुलधारक रेतीअभावी आपले घरकुलाचे बांधकाम अर्धवट करून बसून आहे राहते घर तोडून सर्वसामान्य घरकुलधारक यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे परंतु पैसा देऊन सुद्धा रेती मिळेनासा झाला आहे व पुढच्या महिन्यात पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्व सामान्य घरकुल धारक चिंताग्रस्त आहे रेती न मिळाल्याने गोरगरीब नागरिकांचे घरकुलाचे बांधकाम सध्यातरी थंड्या बस्त्यात आहे व हजारो घरकुलाचे बांधकाम पूर्णपणे बंद आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील किमान मागील वर्षी प्रमाणे शून्य राजस्वावर प्रत्येक घरकुल धारकास पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी चामोर्शी येथील सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष नगरसेवक आशिष भाऊ पीपरे भाजपा बंगाली आघाडी जिल्हा संयोजक व चामोर्शी शहर महामंत्री, रमेश अधिकारी यांनी राज्य सरकारला केली आहे