आशाताई बच्छाव
धनंजय मुंडेंचे निवडणुकीतही पाण्यासाठी प्रयत्न; माजलगावच्या धरणातून सिंदफणा नदीपात्रात सोडले पाणी
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/माजलगाव नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही सर्वत्र पाण्याची अडचण, शेतात ऊस वाळतोय त्यामुळे पालकमंत्री महोदय सिंदफणा नदीपात्रात माजलगाव जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करा; अशा प्रकारची विनंती माजलगाव तालुक्यातील काही ग्रामस्थांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले व अवघ्या दोन दिवसातच माजलगाव जायकवाडी धरणातून शिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. माजलगाव तालुक्यातील शिंपे टाकळी, रोशन पुरी, नागडगाव, सांडस चिंचोली, मनुर, लुकेगाव, दिपेगाव, आधी गावातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांच्यासह माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे माजलगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने माजलगाव धरणातील उपलब्ध जलसाठा तसेच धरणातूनपुढे जाणाऱ्या रोशनपुरी बंधाऱ्यासह विविध गावांना मिळाव्याच्या लाभाचा तातडीने विचार करून माजलगाव धरणातून पुढे पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या होत्या. त्यानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला असून, आज सकाळी प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले. दरम्यान वरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह, जनावरांचे पिण्याचे पाणी, उभे पीक आदींना या पाण्याचा लाभ होणार असून एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांची सोडवून करण्याची वृत्ती लक्षात घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांकडून पालकमंत्री धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंके यांसह संबंधित सर्वांचेच आभार व्यक्त केले जात आहेत.