Home कोरोना ब्रेकिंग पुण्याहुन परतलेल्या दाम्पत्याला घरच्यांनी नाकारले

पुण्याहुन परतलेल्या दाम्पत्याला घरच्यांनी नाकारले

148
0

⭕ पुण्याहुन परतलेल्या दाम्पत्याला घरच्यांनी नाकारले ⭕
नांदेड : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

बिलोली (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील दाम्पत्य पुणे येथून गावात परतले. मात्र, त्यांना घेण्यासाठी घरच्यांनी नकार दिला. गावकऱ्यांनीही तिरस्कार केला. पिण्यासाठी पाणीही दिले नाही, असा भीषण प्रसंग त्यांच्यावर ओढवला.

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. त्यावेळी कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागले. आपल्या संसाराचे गाठोड डोक्यावर घेऊन पत्नीसह तब्बल तीन तास त्यांना रखरखत्या उन्हात ताटकळत उन्हात उभे राहावे , भुकेने व्याकूळ, तहानेने त्रासून गेलेल्या या दाम्पत्याच्या मदतीला ना रक्ताची नाती कामी आली, ना प्रशासन. घरच्या मंडळींसह ग्रामस्थांनी नाकारल्याने तरुण दाम्पत्याने कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानात छोटी झोपडी टाकून तात्पुरता आधार घेतला आहे. उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ आमच्यावर आली असून आयुष्यात कधीच न विसरणारा हा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दाम्पत्याने दिली. बिलोली तालुका प्रशासनाने जिल्हाबाहेरुन आलेल्या मजुरांसाठी शाळा, समाजमंदिर व गावाबाहेर क्वारंटाईन करुन ग्रामस्तरावर देखरेख समिती स्थापन केल्याचे सांगून स्वत:चा उदो-उदो करुन घेतला खरा. प्रत्यक्षात कोल्हे बोरगाव येथे असे काहीच नसल्याचे भयावह चित्र या दाम्पत्यामुळे समोर आले. या दाम्पत्याला प्रशासनाने न्याय मिळवून देण्याची मागणी आता होत आहे.

Previous articleकोरोनाच्या काळात खाद्यपदार्थांना ठेवा सुरक्षित! जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Next articleभारतीय रेल्वेनं देशातल्या सर्वात शक्तिशाली इंजिनाची निर्मिती केली आहे.!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here