Home बीड परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांचा अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने सत्कार...

परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांचा अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न!

80
0

आशाताई बच्छाव

1001223056.jpg

परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांचा अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने सत्कार संपन्न!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. त्रिंबक कांबळे साहेबांचा सत्कार अँड.मनोज संकाये यांच्या मित्र मंडळाच्या वतीने संपन्न झाला. अँड. मनोज संकाये यांनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य केल्याबद्दल आणि त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल सत्कार संपन्न झाला. सामाजिक क्षेत्रात एक आग्रगण्य नाव म्हणून अँड.मनोज संकाये यांच्याकडे पाहिले जाते. परळीच्या विविध समस्यावर ते नेहमी आवाज उठवतात. नगरपालिकेने प्रभू वैद्यनाथ मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर एक भव्य कमान उभारलेली आहे. या कमानीमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी यामुळे झाली आहे. त्याचबरोबर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाखालील ट्रान्सपोर्ट रोड नगरपालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आला. या रोडमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच मेरुगिरी पर्वतावरून काढण्यात आलेला पर्यायी बायपास रोड यामुळे अवजड वाहनांचा प्रश्न निकाली लागला आहे. अशा विविध सामाजिक विषयाला त्यांच्या माध्यमातून न्याय मिळाल्याने हा सत्कार संपन्न झाला आहे. मुख्याधिकारी साहेब हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परळीच्या विकासासाठी त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली आहे. नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्यांच्या समस्यांना गांभीर्याने घेऊन ते पूर्णत्वाकडे नेण्याकडे त्यांचा कल असतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले आहे. यावेळी नगरपालिकेचे नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे, अनिल चौधरी, शिरीष सलगरे, संदीप चौधरी, प्रदीप बुदे, अनिल कातकडे, कैलास रिकिबे, बाळू मुंडे, भागवत जोगदंड आदीसह मित्र मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleश्री छत्रपती संभाजी मा.विध्यालयाचे एन.एम.एम.एस.परिक्षेत घवघवीत यश
Next articleकॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here