Home जालना मराठा मावळा संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश जालना बाजार समितीत अखेर शेतकर्‍यांच्या मुलांसाठीच्या...

मराठा मावळा संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश जालना बाजार समितीत अखेर शेतकर्‍यांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहाचे लोकार्पण

11
0

आशाताई बच्छाव

1000819130.jpg

मराठा मावळा संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश
जालना बाजार समितीत अखेर शेतकर्‍यांच्या मुलांसाठीच्या वसतिगृहाचे लोकार्पण
जालना,ः दिलीप बोंडे ब्युरो चीफ –केवळ आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. गुणवत्ता आणि बुद्धीमत्ता असूनही ग्रामीण भागातील मुले स्पर्धेत मागे राहतात. अशा शेतकर्‍यांच्या मुलांसाठी जालनासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने वसतीगृह उभारावे, अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने लावून धरली होती. या मागणीला यश आले असून, रविवारी या वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
शेतकर्‍यांच्या मुलांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वसतिगृह उभारण्यात यावे, अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृउबाचे सभापती अर्जुनराव खोतकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच या मागणीच्या अनुषंगाने आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत रविवारी वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, सद्या शेतकर्यांची आर्थीक परिस्थिती बिकट झाली असून पावसाअभावी शेतकर्यांची रब्बी पिके हातची गेली तर खरीप पिकाचीही गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठविणे कठीण झालेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षण अर्ध्यात सोडविण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत शासनाने मुलांसाठी तात्काळ वस्तीगृह उभारण्यासाठी हालचाल सुरू केली तर निश्चितच शेतकर्यांच्या मुलांसाठी शिक्षण घेणे सोयीस्कर होईल, असे या निवेदनात म्हटले होते.या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर,  दादाराव गावंडे, महादेव कदम, आत्माराम गायकवाड, आदींच्या सह्या आहेत.

Previous articleभोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रस्थापितांना आजी-माजी आमदारांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा- अ‍ॅड. भास्कर मगरे
Next articleजनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला ; आ. कैलास गोरंट्याल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here