Home गडचिरोली आधुनिक युगामध्ये महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रांमध्ये अव्वल ठरतील:—

आधुनिक युगामध्ये महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रांमध्ये अव्वल ठरतील:—

16
0

आशाताई बच्छाव

1000801743.jpg

आधुनिक युगामध्ये महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रांमध्ये अव्वल ठरतील:—

भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

लोकमत सखी मंचच्या वतीने सुपर मॉम कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ–

प्रत्येक महिला स्वतःच्या संसाराची काळजी घेण्यासाठी सातत्याने लढत असतात.महिला गृहिणी असो,नौकरदार असो ,गरीब घरातील असो वा श्रीमंत तिला कुटुंबाप्रती सर्व कर्त्यव्य पार पाडावी लागतात.
या सर्व दैनंदिन व्यापातून महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ भेटत नाही पुरुषाप्रमाणे महिलांमध्ये सुध्दा विविध क्षेत्रामध्ये नाविन्याने काम करण्याची क्षमता असते परंतु त्यांना संधी मिळत नाही.संधी मिळाली तर संधीचे सोने करणार असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.

लोकमत सखी मंच यांच्या वतीने सुपर मॉम कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक चामोर्शी रोडवरील कात्रटवार सभागृह येथे करण्यात आले होते.यावेळी सौ.योगीताताई पिपरे यांनी लोकमत सखींना संबोधित करतांना बोलत होत्या.

यावेळी राजुभाऊ कात्रटवार ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंदजी नरोटे, रविभाऊ भांडेकर,नलीनीताई पोटकर,सीमाताई दुर्गे,ज्योतिताई उंदिरवाडे,अर्चनाताई मुळे,लोकमत सखी मंच संयोजिका रश्मीताई आखाडे व लोकमत सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश उंदिरवाडे यांनी केले.

Previous articleखासदार सुनिलजी तटकरे यांचे नागोठणे विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन
Next articleगडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here