Home बीड परळी शहरातील अवजड वाहनाची वाहतूक टोकवाडी बायपास मार्गे व वैद्यनाथ मंदिर परिसरात...

परळी शहरातील अवजड वाहनाची वाहतूक टोकवाडी बायपास मार्गे व वैद्यनाथ मंदिर परिसरात फाटक बसवण्यासंदर्भात अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार!

16
0

आशाताई बच्छाव

1000760832.jpg

परळी शहरातील अवजड वाहनाची वाहतूक टोकवाडी बायपास मार्गे व वैद्यनाथ मंदिर परिसरात फाटक बसवण्यासंदर्भात अँड. मनोज संकाये मित्र मंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार!

जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन प्रश्न मार्गी काढावा – अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: १८ सप्टेंबर २०२४ परळी शहरातील अवजड वाहनांची वाहतूक टोकवाडी – जिरेवाडी येथील बायपास मार्गे करावी तसेच वैद्यनाथ मंदिर परिसरात कायमस्वरूपी लोखंडी फाटक बसवण्याचे काम त्वरित सुरू करण्यासंदर्भात बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मित्र मंडळाच्यावतीने निवेदन देणार असून जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालून कामास गती द्यावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्याभरापूर्वी यासंदर्भात परळी पोलीस स्टेशनचे पी आय आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदन सादर करताना मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मात्र निवेदनाचा कसल्याही प्रकारचा विचार केला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून यावर चर्चा करून निवेदन मित्र मंडळाच्या वतीने सादर केले जाणार आहे. मंदिर परिसरातील दक्षिणमुखी गणेश मंदिराजवळ व नगरपालिका समोर फाटकसाठी मोठे खड्डे खोदले आहेत. जवळपास आठ दिवसापूर्वी खड्डे तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. खड्डे मोठे असल्याने त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पडण्याचा धोका संभवत आहे त्यामुळे परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न संदर्भात माननीय जिल्हाधिकारी सकारात्मकता दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी त्यांच्याकडून केली आहे.

Previous articleशेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी
Next articleराष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती दया ; खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here