Home अमरावती कोणालाही पाडण्यासाठी काही भाऊ सुपारी घेतात: आता माफी नाही, हिशोब होणारच, बच्चुभाऊ...

कोणालाही पाडण्यासाठी काही भाऊ सुपारी घेतात: आता माफी नाही, हिशोब होणारच, बच्चुभाऊ कडूच्यां बालेकिल्ल्यात नवनीत राणा कडाडल्या.

97
0

आशाताई बच्छाव

1000689765.jpg

कोणालाही पाडण्यासाठी काही भाऊ सुपारी घेतात: आता माफी नाही, हिशोब होणारच, बच्चुभाऊ कडूच्यां
बालेकिल्ल्यात नवनीत राणा कडाडल्या.
दैनिक युवा मराठा.
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .
अमरावती.
सुपारी बाजांनी माझा पराभव करण्याची सुपारी घेतली वर्षात अचलपूर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या बच्चुभाऊ कडूंनी तुम्हाला रोजगार दिला काय,? असा सवाल भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तर सुपारी बहाद्दरला अचलपूर मतदारसंघातून आऊट करणार की नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाल्या की, काही लोकांनी सुपारी घेऊन मला पाहिजे आणि अमरावतीला १० वर्ष मागे लोटल, हे ढोंगी नाटक बाज, सुपारी बहादूर असून त्यांनी तुम्हाला काही दिले, आता तुम्ही या सगळ्यांचा हिशोब करायचा आहे. आता माफी नाही, असे त्यांनी परतवाडा शहरात दहीहंडी च्या कार्यक्रमांमध्ये म्हटले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे नेते टी. राजा सिंह देखील उपस्थित होते. नवनीत राणा म्हणाल्या, काही भाऊ पाण्याची सुपारी घेतात. ते तोड पाणी बहाद्दर, ब्लॅक मेलर, ढोंगी आणि नाटक करणारे तुम्हाला माहिती आहे ना? माझा निवडणुकीत पराभव झाला नाही तर जिल्हा १० मागे गेले. यासाठी सुपारी बाजांणी सुपारी घेतली होती. या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, टेक्सटाईल पार्क मी आणले. जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. निवडणुकीत पराभूत झाली आहे, श्वास अजूनही जिवंत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा होण्यासाठी काम करत राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार टी. राजा सिंह म्हणाले की, नवनीत राणा माझी बहीण आहे. आता येथील जनता त्यांच्या पराभवाचा हिशोब घेणार. ही अर्धी जन्माष्टमी आपण साजरी करत आहोत. जेव्हा मथुरा पूर्ण आपल्याकडे येईल तेव्हा खरी जन्माष्टमी साजरी करणार.जे सांगत होतो राम मंदिर होणार नाही अखेर ते झाले. ज्ञान वापी तेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा खरी जन्माष्टमी साजरी करू. तोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत कर्तव्य पार पाडा, असे त्यांनी म्हटले आहे. लव्ह ज्याला उत्तर घ्या युवकांनो असे आवाहन करत टी. राजा सिंह म्हणाले की, महाराष्ट्र नव्हे तर देशात हिंदूंच्या मुलींना फसवण्याचे काम सुरू आहे. मुलांना पैदा करण्याची मशीन आपल्या बहिणीचा बनवत आहेत. धर्माचा प्रचार करायचा असेल तर विश्व हिंदू परिषद आरएसएस मध्ये सहभागी व्हा आणि लव्ह जिहादला ठोकायचे असेल तर बजरंग दलामध्ये सामील व्हा. आता हिंदू राष्ट्र होण्यासाठी कोणतीच ताकद रोखु शकणार नाही. योगी जी तेच काम करताय. याच महाराष्ट्राच्या धर्तीवर बाळासाहेब ठाकरे या वाघाने जन्म घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here