Home जालना मस्तगड येथे सामूहिकरित्या मनुस्मृतीचे दहन करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष...

मस्तगड येथे सामूहिकरित्या मनुस्मृतीचे दहन करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांची माहिती

19
0

आशाताई बच्छाव

1000675367.jpg

मस्तगड येथे सामूहिकरित्या मनुस्मृतीचे दहन करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांची माहिती.                                                          जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून देशातील सर्व जातींच्या महिलांना सन्मानाने जगण्याचा व समानतेचा हक्क मिळवून दिला. परंतु, शिंदे सरकारने मनुष्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला विरोध करण्यासाठी दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव, कुणाल दादा राऊत मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून देशातील सर्व जातींच्या महिलांना सन्मानाने जगण्याचा व समानतेचा हक्क मिळवून दिला. परंतु राज्यातील भाजप प्रणित असलेले शिंदे सरकारचा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार आणि वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. त्यांना देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचार मुलांच्या निरागस मनावर लादण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयी एकाच वेळेस मनुस्मृती ची होळी करुन सरकारच्या या कृत्याचा निषेध करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना येथे देखील मनुस्मृतीचे दहन करुन आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम द्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करून या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे.

Previous articleविकसित भारतासाठी एमएमआर प्रदेश पॉवर हाऊस: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleमाहेर’ च्या रक्षाबंधनामुळे बहिणींच्या चेहर्‍यावर हास्य फुलले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here