Home अमरावती गरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी: राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा.

गरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी: राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा.

24
0

आशाताई बच्छाव

1000664704.jpg

गरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी: राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा.
दैनिक युवा मराठा

पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
मॉल मजुरी करणाऱ्या नागरिकांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच नजोलच्या जागेवर झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी राजवीर संघटनेचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर( पुतळा ईर्विन)चौक अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरातील विविध भागात अनेक गरीब, गरजू नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांच्या मागण्यासाठी राजवीर संघटनेच्या नेतृत्वात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही तोडगा काढला नसल्याचे आरोप संघटनेने केला,. मुस्लिम बहुल परिसरात नवसारी परिसरात डीपी स्कूल, महाविद्यालय, ट्रान्सपोर्ट, मुस्लिम कब्रस्तान, क्रीडा मैदान आदीसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामनाथ खान, मोबीन खान, राजीव अब्दुल, निलेश इंगळे, अब्दुल राजिक, शाहीन खान, उपस्थित होते.

Previous articleजीएसटी चोकीगिरी प्रकरणी पालेकर बेकरीची चौकशी. कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू.
Next articleबागलाणची जागा काँग्रेसला सोडा,अन्यथा पराभवास सामोरे जा..!! आदिवासी काँग्रेस सेलचा महाविकास आघाडीस इशारा..*(
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here