Home बीड परळीत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरावस्था; यापुढे एकाही नागरिकाचे रक्त सांडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर...

परळीत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरावस्था; यापुढे एकाही नागरिकाचे रक्त सांडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू- अँड.मनोज संकाये

68
0

आशाताई बच्छाव

1000608415.jpg

परळीत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरावस्था; यापुढे एकाही नागरिकाचे रक्त सांडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू- अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि : ०३  रोजी परळी वैजनाथ येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाची दुरावस्था झाली असून या पुलावर अनेक नागरिकांचे दररोज अपघात होत आहेत येणाऱ्या काळामध्ये एकही अपघात झाला तर संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करू असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी दिला आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्याबाबत त्यांनी दिनांक २६ जुलै २०२४ रोजी प्रशासनास निवेदन आणि विविध दैनिकांमध्ये बातमी प्रसिद्ध केली होती.

निवेदन सादर केल्यानंतर तसेच विविध दैनिकातून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने तात्पुरती रोडची डागडुगी केली. मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले परंतु मागणी मध्ये संबंधित पुलाचे खड्डे डांबरी करण करून बुजवण्यात यावेत अशी होती परंतु तसे न करता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरती मलमपट्टी केली. त्याच पुलाच्या वळणावर जेथे पोलीस चौकी आहे तेथेच पुलाचे कटाडे मोडून पडली आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी दुचाकी वाहन त्या कठाड्यातून जाताना बाल बाल बचावले असे प्रकार सर्रास घडत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

संबंधित नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलले असता त्यांच्याकडून मात्र ठोस उत्तर मिळत नाही त्याऐवजी एकमेकाची जबाबदारी ढकलण्यामध्येच अधिकारी मग्न आहेत मग सामान्य माणसाच्या जीवाची परवा नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसांमध्ये या खड्ड्यामध्ये पाणी साठल्यामुळे चिखल होतो आणि वाहने स्लीप होत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मोठा मुरूम खड्ड्यांमध्ये टाकला आहे त्यामुळे वाहनधारक पडत आहेत तसेच खड्ड्यांमधील मोठे दगड उडून नागरिकांना इजा पोहोचवत आहेत पर्यायी त्यांना शारीरिक इजा पोहोचत आहे. या सर्व बाबींसाठी कोण जबाबदार आहे याचा तपास संबंधित विभागाने घ्यावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Previous articleम्हसरूळ येथील गोपाल जाधव यांची PSI पदी निवड.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समीतीच्या वतीने सत्कार
Next articleमानवी अस्तित्व कशासाठी आहे ओयाशिसच्या शोधात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here