आशाताई बच्छाव
मन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता विद्यालयात पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 02/08/2024
आज दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यालयामध्ये शे. फारूख शे- ममलुभाई मुजावर अध्यक्ष, सहकारी कार्यकारी सोसायटी पिंपळगांव सराईचे तसेच मन्नत फाउंडेशन सैलानी यांच्या हस्ते वारकऱ्यांचा पोशाख तसेच पुष्पमाला घालुन सत्कार करण्यात आला.
बोरगांव काकडे येथील वारकरी श्री रामदास जनार्धन खंडागळेगेल्या ५६ वर्षापासून तसेच माळशेंबा येथील वत्सलाबाई, किसन उगले हे वारकरी गेल्या १८ वर्षापासून दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. यावर्षी सुद्धा त्यांनी न थकता न थांबता वारी पूर्ण केलेली आहे. “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या” .या अभंगाप्रमाने पांडुरंगाला क्षणभर डोळ्यामध्ये साठवण्यासाठीचा हा वारीचा अट्टाहास.
याच गोष्टीचा ध्यास विद्यार्थ्यांना लागावा व विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन. शे. फारुखसेठ दरवर्षी अशा वारकऱ्यांना पोशाखरुपी भेटवस्तू व मिठाई देऊन त्यांचे सत्कार करत असतात.
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रमोदजी ठोंबरे सर यांनी वारीचे महत्त्व विषद केले. पर्यवेक्षक श्री आरसोडे सरांनी वारक-यांचे तसेच शेख फारूख सेठ यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी बंधू भगिनीचे सहकार्य लाभले.