आशाताई बच्छाव
जळलेल्या मोसंबी बागांचे पंचनामे करून अनुदान द्या
सतीश घाटगे यांचा प्रशासनास इशारा
अंबड/जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): दुष्काळी परिस्थितीमुळे जळालेल्या मोसंबी बागांसह अन्य फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा सतीश घाटगे यांनी केली आहे. आठवडाभरात जळालेल्या मोसंबीचे बागाचे पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सतीश घाटगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे
जालना जिल्ह्यातील अंबड –घनसावंगी तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी अनेक वर्ष जपलेल्या फळबागा यावर्षी जळून गेल्या आहेत. ऐन दुष्काळात मोसंबी फळबाग वाचवने शेतकऱ्यांना शक्य नाही, कारण कुठेही पाणी उपलब्ध नाही. विकतच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च करूनही अनेकांच्या बागा कडक उन्हात करुपून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर फळबागा वाचवण मोठे आव्हान आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा पाणी टंचाई सर्वात मोठी समस्या ठरली आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या फळबागा जळाल्या आहेत. मोसंबी फळबागांचे सर्वात जास्त नुकसान झाले. सर्वाधिक फळबाग क्षेत्र असलेल्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील देखील सध्या सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. या तालुक्यातील शेतकरी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करीत आहेत.परंतु, तरीदेखील कडक उन्हासामोर उपाययोजना अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अनुदान तातडीने मिळण्यासाठी प्रशासनाने स्तरावरून तात्काळ पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात महसूल यंत्रणेकडून पंचनामे करण्यास सुरवात न झाल