*दोन्ही राजांनी केंद्राच्या मदतीने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,*
*केंद्रीय अध्यक्ष शरद पवार*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी केंद्राच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्वही करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी केले. दरम्यान, कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्वाना एकत्रित करणार असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.
मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. या लढय़ात तयार झालेले गट-तट आणि नेतृत्वाच्या मुद्दय़ावरूनही विविध मतमतांतरे होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांनीच पुढाकार घेण्याची मागणी पुढे येत आहे.
हाच धागा पकडत पवार म्हणाले, की या दोघांनीच या लढय़ाचे नेतृत्व करावे. हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी भाजपाकडून या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.